Monday, June 27, 2011

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

म्हणून ते प्रेम करायचे नसते,

नाही मिळाले ते परत तरी

आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,

दुखवले कितीही तिने

तरी हसून तीच्या परत समोर जायचे असते,

कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिल्याने

प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,

म्हणूनच नाही मिळाले परत तरी

निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचे असते...

No comments:

Post a Comment