
रु शकणार नाही.कारण तु खुप एकलकोँडा,खुपच साधा आहेस.तु तर एखाद्या मशिनप्रमाणे काम करतोस,तुझं वेगळं व्यक्तिमत्व म्हणुन असं काही नाहीच.यांवर भास्कर खुपच निराश होऊन कॉलेज सोडुन निघुन गेला.काही दिवस तसेच जातात,नंदिताला भास्करचा विसर पडतो.आणि आता इथे कथेच्या नायकाची entry होते रोमियो त्याचं नाव.एक स्टाईलिश पर्सन.सुट,जीन्स स्टाईलिश गोगल,बुट.एकदम attractive हेअरस्टाईल.असा तो रोमिओ.नंदिताला पाहताच त्याला ती आवडते,सर्व मुलीँच्या मधुन तो तिच्या जवळ जातो आणि म्हणातो,"आपकी खुबसुरती को मेरी आँखो से पिलु,एक पल आपके प्यार का दे दो,उस पल में सो जनम भी जिलु".....काय?(नंदिता म्हणाली) तोःकाही नाही,हे फुल घे आणि माझ्या मैत्रीचा स्वीकार कर...तिला थोडा वेळ काही समजलच नाही.पण त्याची ही शायरी तिला खुप आवडली.तिनं ते फुल घेतलं आणि त्याच्यी मैत्री स्वीकारली.नंतर त्यांची हीच मैत्री वाढु लागली.रोमियट नंदिताला आवडु लागला,त्याची स्टाईल त्याचं बोलणं एकदम खुप वेगळं होतं.मग एक दिवस रोमियोने त्याच्या स्टाईलमध्ये नंदिताला प्रपोझ केलं.तिनं वेळ न लावता त्याला होकार दिला.मग त्यांचं हे प्रेम नंतर कॉलेजभर पसरलं.एक दिवस ती त्याला आपल्या घरी घेऊन गेली,घरच्यांना तर रोमियोबद्दल तिने आधीच सांगीतलं होतं.पण ते सगळे बाहेर गेले होते.घरात फक्त दोनच दिवसापुर्वि अमेरिकेहुन आलेले तिचे मामा होते जे एक मानसोपचार तज्ञ होते.त्यांनि रोमियोशी काही प्रश्न विचारले.त्याने त्या प्रश्नाची सराईतपणे उत्तरे दिली.त्यांना ते आवडलं पण त्याच्या बोलण्यातील दुट्प्पीपणा त्यांना जाणवला.त्यांनी नंदिताला चहा करण्यास सांगितलं.ती किचनमध्ये गेल्यावर ते रोमियोला म्हणाले मला तुझ्याविषयी काही सत्य जाणुन घ्यायचंय,म्हणुन मला तुला संमोहीत करायचंय,त्याने त्यांना काहीही न विचारता होकार दिला.त्यांनी त्याला संमोहित केलं,काही प्रश्न विचारले आणि पुन्हा रोमियोला भानावर आणलं.तोपर्यँत नंदिता चहा घेउन आली,तिच्या मामांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला.ते दोघं खुश झाले नंतर तिने रोमियोला बाहेरपर्यँत ड्रोप केलं.ती घरात आल्यावर मामांनी नंदितालला प्रश्न विचारला,तुला काही दिवसांपुर्वी कोणी भास्कर नावाच्या मुलग्याने लग्नाची मागणी घातली होती? नंदिताला हे ऐकुन आश्चर्याचा धक्काच बसला कारण ही गोष्ट भास्कर आणि फक्त तिलाच माहीती होती,मग तिने मामांना त्याबद्दल सगळं सांगुन टाकलं.मामां हे ऐकुन त्यावर म्हणाले,तो मुलगा आता कोण आणि कुठे आहे माहीतीये तुला? नाही मला नाही माहीती.तुझा हा रोमियो म्हणजे तोच भास्कर आहे.तीःहे कसं शक्य आहे मामा तुम्ही काहीही काय बोलताय?मामाःसांगतो सगळं सांगतो,हा भास्कर बालपणापासुन एकटाच राहतो.त्याचे आईवडील त्याच्या बालपणीच गेले.त्यामळे त्याचा बाहेरच्या जगाशी फारच कमी संबंध आला.त्यामुळे तो स्वतःच्या जगात मग्न झाला.तो स्वतःशीच बडबडु लागला.स्वतःशीच खेळु लागला.माणसामध्ये चेतन आणि अचेतन असे मनाचे दोन भाग असतात.ते जसं कम्प्युटरचा ram आणि harddisc काम करतात ना तसेच काम करतात.भास्कर एकटा पडु नये म्हणुन त्याला गरज असलेला मित्राची गरज त्याच्या अचेतन मनाने त्याच्यामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करुन भागवली.यालाच सायंटिफिक भाषेत split personality(दुभंगित व्यक्तिमत्व)म्हणतात.जो एक मानसिक आजार आहे.तो मोठा झाला तुझ्या प्रेमात पडला तु त्याला नाही म्हटलंस.यामुळेच भास्कर आत्महत्या करणार होता.स्वतःला या परिस्थीतीतुन बाहेर काढण्यासाठी त्याच्या अचेतन मनाने एक स्टाईलिश व्यक्तिमत्व accept केलं.भास्करचा romio झाला.पण तुला हे ऐकल्यावर तर जास्त आश्चर्य वाटेल की भास्कर आणि रोमियो या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असंच भास्करला वाटतं.भास्करच्या अचेतन मनाने स्वतःमध्ये अशी सेटींग लावलीय की तो जेव्हा तुला बघतो तेव्हा तो आपोआपच भास्करचा रोमियो होतो.हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा एखाद्या गोष्टीप्रती तुम्ही तुमच्या मनाला पुर्णपणे वाहुन नेता.आणि तुझ्या प्रेमामध्ये भास्करने स्वतःला खुप वाहुन नेलंय.
नंदिताचा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता,म्हणुन तिने मामाला विचारलं,हे तुम्हाला कसं माहीत?मी एक प्सायकॅट्रीस्ट आहे.मघाशी त्याला प्रश्न विचारताना,त्याच्या स्वभावातील दुट्प्पीपणा मला जाणवला.म्हणुन मी तुला चहाच्या बहाण्याने आत पाठवलं,त्याच्या परवानगीने त्याला संमोहीत केलं,आणि त्यानेच ही सर्व हकीकत सांगितली...मामा काहीही करा मी त्याच्यावर खुप प्रेम करते हो.तो कोणीही असो पण माझं त्याच्यावर खुप प्रेम आहे,त्याला यातुन बरं करा.मामा म्हणाले,घाबरु नकोस बेटा,तो फक्त एक मानसिक आजार आहे जो नक्की बरा होईल।मामांच्या सांगण्यावर तिने रोमियोला सांगितलं,कि तु रोमियो नसुन भास्कर आहेस.ही गोष्ट त्याच्या मनाला पटली नाही,त्याला वाटत होतं हे तर अशक्य आहे भास्कर कुठे आणि मी कुठे?पण फक्त नंदिताच्या प्रेमाखातर तिच्या सांगण्याने त्याने तिच्या मामाकडे संमोहन उपचार चालु केले.आणि एका महीन्यातच तो बरा झाला.नंदिता खुपच आनंदी दिसायची.रोमियोचा कधी भास्कर झाला हे त्याला कळलंच नाही.पण नंदिताला नक्की कळलं की,स्टाईल,गुडलुक हे फक्त एक आकर्षण असतं.जे कधी ना कधी संपतच.पण माणसाचा स्वभाव त्याचं मन हे कधीच बदलत नाही....त्यामुळे एखादा मुलगा रोमियो असो वा भास्कर त्याची स्टाईल नाही त्याचं मन त्याचा स्वभाव बघा.स्वभाव चांगला असेल तर आयुष्यभर तुम्ही त्याच्यासोबत सुखी राहाल,मग भलेही तो दिसायला साधा का असेना
नंदिताचा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता,म्हणुन तिने मामाला विचारलं,हे तुम्हाला कसं माहीत?मी एक प्सायकॅट्रीस्ट आहे.मघाशी त्याला प्रश्न विचारताना,त्याच्या स्वभावातील दुट्प्पीपणा मला जाणवला.म्हणुन मी तुला चहाच्या बहाण्याने आत पाठवलं,त्याच्या परवानगीने त्याला संमोहीत केलं,आणि त्यानेच ही सर्व हकीकत सांगितली...मामा काहीही करा मी त्याच्यावर खुप प्रेम करते हो.तो कोणीही असो पण माझं त्याच्यावर खुप प्रेम आहे,त्याला यातुन बरं करा.मामा म्हणाले,घाबरु नकोस बेटा,तो फक्त एक मानसिक आजार आहे जो नक्की बरा होईल।मामांच्या सांगण्यावर तिने रोमियोला सांगितलं,कि तु रोमियो नसुन भास्कर आहेस.ही गोष्ट त्याच्या मनाला पटली नाही,त्याला वाटत होतं हे तर अशक्य आहे भास्कर कुठे आणि मी कुठे?पण फक्त नंदिताच्या प्रेमाखातर तिच्या सांगण्याने त्याने तिच्या मामाकडे संमोहन उपचार चालु केले.आणि एका महीन्यातच तो बरा झाला.नंदिता खुपच आनंदी दिसायची.रोमियोचा कधी भास्कर झाला हे त्याला कळलंच नाही.पण नंदिताला नक्की कळलं की,स्टाईल,गुडलुक हे फक्त एक आकर्षण असतं.जे कधी ना कधी संपतच.पण माणसाचा स्वभाव त्याचं मन हे कधीच बदलत नाही....त्यामुळे एखादा मुलगा रोमियो असो वा भास्कर त्याची स्टाईल नाही त्याचं मन त्याचा स्वभाव बघा.स्वभाव चांगला असेल तर आयुष्यभर तुम्ही त्याच्यासोबत सुखी राहाल,मग भलेही तो दिसायला साधा का असेना
No comments:
Post a Comment