Monday, June 27, 2011

ओढ" म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही....
"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही....
"प्रेम" म्हणजे काय ते
...स्वत: केल्याशिवाय समजत नाही....
"पराजय" म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही....
"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही....
“सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही...

No comments:

Post a Comment