Friday, August 12, 2011

तिची आणि माझी na खूप जुनी मैत्री होती....
इतकी ना कि एकमेकांना भेटल्यावर चिंता काढून खरच समोर आहोत का check करायचो... ;)
.
किती मस्त असत ना जीवन...
असेच दिवस जात होते... मी engineeing मध्ये somaiya कॉलेज ला आणि ती दत्ता मेघे ला लागली ...
मग भेटायला असा कधी वेळा मिळाला चा नाही...
.
मग रोज call करून कधी messege करून... बोलायचो..
फार मजा यायची...
कधी तरी भेटलो ना कि इतका मन भरून यायचा ना...
फार म्हणजे फार बर वाटायचा...
.
दिवस जात होते... पाहिलं वर्ष झाला...
मैत्री फुलात होती...
खूप छान दिवस जात होते...
मी कधी मैत्री शिवाय काही पहिले नाही.... आणि आहे त्यात फार खुश होतो...
.
मैत्री मध्ये पहिली priority मलाच द्यावी असा आग्रह... ;)
.
पण असत ना कि जीवन काट्यांचा...
झालंही तसच...
.
बरेच दिवस झाले माझा आणि तिचा बोलन नाही झालं...
तिने मला अचानक मला call केला...
but lecture चालू होता so मी call उचलला नाही...
मग तिचा messege आला "मी commmited आहे..."..
.
डोकं सटकल माहित नाही का???
मग महिना झाला मी call केलाच नाही...
तीचे रोज call होते ...
पण मन कधी झालाच नाही....
.
मग अचानक एका दिवस ठाण्याला class ला जाताना भेटली...
आणि तीने पाहता क्षणी समोर आली आणि जोराची कानाखाली मारली...
आणि म्हणाली हिचा एका गोष्ट आहे जी मी तुझ्या वर हक्काने करू शकते...
.
मूर्ख परत जर मला त्रास दिला न तर बघ...

आणि मग स्वताचा रडायला लागली..
आणि म्हणाली तो messege तर मी असाच पाठवला...
आणि तू खरा मानला...
.
आणि मग मला हि रडयालाचा आला...
जणू मला एका खरच खरा मित्र मिळाला होता.

Saturday, August 6, 2011

तुझशिवाय.........

जीवन हे जगण्यासाठी
जगण हे तुझसाठी
तू फ़क्त मझसाठी

तुझशिवाय जगण जमणार नाही
जीवनातून ही वजाबाकी होणार नाही

तुझशिवाय जगण व्यर्थ आहे
तु मला भेटण यातच जीवनाचे सार्थ आहे

तुझशिवाय जगण्याला अर्थ नाही
मरत जगण मला जमत नाही
असाव कुणीतरी…..
तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..
असाव कुणीतरी…..
तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..
असाव कुणीतरी…..
सकाळी साखरझोपेतुन उठवणारी,
आणी तो चेहरा बघुन माजी क्षणात झोप उडावी….
असाव कुणीतरी…..
प्रेमाने सकाळी चहा करून देणारी ,
आणी केविल्वान्य डोळ्यानी माज़कडे पाहत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
मी जवळ नसतानामाज्या सोबत घालवलेल्या,
प्रतेक क्षणाची आठवण काढत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
कुठेतरी.. कुठेतरी.. असेल ती !
जिथे जग आहे माझे, सोबत तिच्या..
जिथे मी, जिथे ती, जिथे भावना माझ्या नि तिच्या ||
जिथे होई सकाळ पापण्यांच्या किरणांनी तिच्या..
जिथे ऐके अंगाई चंद्र, मखमली कुशीत तिच्या ||
जाने न कोठे जग ते आहे, न जाने ती आहे वा नाही |
जिथे श्वास आहे हरवलेला, ओढीने तिच्या |
जिथे हरवलो, आहे गहिवरलो गोड स्वप्नात तिच्या ||
जिथे ती, ती, म्हणता.. डूबले मीपण आसमंतात तिच्या |
जिथे अवघे आयुष्य हासे, " मूर्खा " या शब्दात तिच्या ||
जाने न कोठे जग ते आहे, न जाने ती आहे वा नाही |
धेय्या पासून वाटा शोधत आहे..
धेय्यच हरवले आहे कोठेतरी, वाटांमध्ये !
कुठेतरी.. कुठेतरी.. असेल ती स्वप्नपरी..
माझी प्रेयसी..........

माझी प्रेयसी गोरी आहे
जणू चीकन तंदुरी आहे ,
तिच्यावीषयी काही बोलण्याची
मला मात्र चोरी आहे .

माझी प्रेयसी गोड आहे
हापूस आंब्याची फोड आहे
नवर्याला मुठीत ठेवीन अशी
तीला भारी खोड आहे .

माझी प्रेयसी सोज्वळ आहे
डोळ्यात तिच्या काजळ आहे
माझ्या वीषयी तिच्या
मनात तळमळ आहे

माझी प्रेयसी भित्री आहे
वटवट सावित्री आहे .
तीचे माझे पटणार नाही
ह्याची मला खात्री आहे .

माझी प्रेयसी मस्त आहे
स्वभाव तिचा थोडस सुस्त आहे .
तिच्यापेक्षा मी बावळट आहे
म्हणून ती निर्धास्त आहे .

माझी प्रेयसी हट्टी आहे
स्वभाव तीचा थोडासा कपटी आहे
एका शुल्लक कारणावरून
कालपासून आमची कट्टी आहे .
जरा चुकीचे... तरी बरोबर......
जरा चुकीचे, तरी बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
भीडले नाहीत डोळे तोवर, बोलू काही......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
हवे-हवे ते हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; पोरींवर बोलू काही......

"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
आज "हिचे" रे "तिचे"ते नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
वाट आंधळी, प्रवास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही....
Color Of Love - तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा ?

प्रत्येक माणूस प्रेम करतो. प्रत्येकाची प्रेम करायची स्टाईल वेगळी असते आणि प्रत्येकाच्या प्रेमाचा रंगही वेगळा असतो.


तांबडा !
"मै तुम्हारेलिये जान दे भी सकता हू और ले भी सकता हू" हे या तांबड्या प्रेमींचं ब्रीदवाक्य.
एकदा प्रेमात पडले तर त्यांना दुसरं काही दिसत नाही. यांचा माथा नेहमीच गरम असतो. यांना आवडणार्‍या व्यक्तीकडे दुसर्‍या कोणी फक्त बघितलं तरी यांच लाल-लाल रक्त ऊकळू लागतं. दुसरं कोणी आपल्या वाटेत येऊ नये यासाठी ते काहीही करू शकतात..

तांबड्या मुलींना सगळ्याच मुली स्पर्धक वाटतात. त्यामुळे इतर मुलींनी वाढवलेले केस हे आपल्याला ऊपटण्यासाठीच आहेत अशी त्यांची समजुत असते. लग्नानंतर तांबड्या बायकांना आपला नवरा म्हणजे एक ढोल वाटतो. त्याने जराजरी आजूबाजूला बघितले तरी त्या आपल्या ढोलाची चामडी तापवून, लाटण्याने बडव बडव बडवतात.

दोन तांबडे कधीही एकत्र राहू शकत नाहीत. चुकूनही जर अशी कल्पना कोणाच्या डोक्यात आली तर "जानी दुश्मन" सारखे चित्रपट जन्माला येतात !
******************************​******************************​******************************​******


नारिंगी !
ते रोज जीमला जातात आणि मुलीला इम्प्रेस करण्यासाठी यांच्या गळ्यात वाघाचं नख असलेली जाडी चेन, मनगटाला एक सोन्याचा साखळदंड आणि हातात २०-२५ हजाराचा मोबाईल सर्रास दिसतो. तांबड्यांसारखे भडक नसले तरी या भगव्यांचा मूड नेहमी बदलत असतो. कधी ज्वालामुखीसारखे तप्त तर कधी संत्र्यासारखे थंड असतात. असे बरेच भगवे शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. अंगाने मजबूत असले तरी मनाने हे तेव्हढेच हळवे असतात. मुलगी पटावी यासाठी ते मारुतीला सांगड घालतात! आपलं नशीब आजमावायचं असेल तर कुठल्यातरी बाबाला त्यांच्यासमोर भोंदू म्हणून पहा. पुढची जबाबदारी मात्र माझी नसेल.

एखाद्या प्रेमी त्रिकोण असलेल्या हिंदी पिक्चरला जाताना जी एक तास फक्त मेकअप करेल आणि सिनेमा चालू असताना तोच मेकअप हुंदके देऊन रडून पुसून टाकेल ती १०१ टक्के नारिंगी नार होय. अशा या शेंदरी मुली डोक्याने दगड असतात. सहाजिकच त्या सुंदर असतात. त्यांचा प्रेम करणे हाच उद्योग असतो. काही वाक्य टाकायची असतील तर त्या हिंदीत बोलतात. "तुमपे मैने जितना प्यार किया उतना और कोई नही कर सकता" वगैरे वगैरे. या भगव्या मुली दिवसातुन चार-पाचदा तरी "दिलके तुकडे" वगैरे करत असतील.

दोन भगवेही एकत्र संसार करू शकत नाहीत.
******************************​******************************​******************************​******


पिवळा!
मुळातच मुळमुळीत असलेल्या पिवळया प्रेमींच सगळं काही गुपचूप असतं. हे पिवळे प्रेमी एकमेकाला भेटायच्या अशा काही जागा शोधून काढतात की बास रे बास.

पिवळ्यांना थापा मारायची भलतीच सवय असते. म्हणजे त्यामागे त्यांचा काही वाईट हेतू नसतो, पण कोणाला आपलंस करून घ्यायला त्यांच्याकडे फारसे उपाय नसतात. "मी तुला सोन्याने मढवेन", "मी फक्त तुझाच आहे" अशी वाक्य या पिवळ्यांना कोणी शिकवीत नाही.

दोन पिवळे सुखाने एकत्र नांदू शकतात कारण दोन्ही जणं दुसर्‍याच्या भल्यासाठीच थापा मारत असतात. एखादी थाप पचली नाही तरी फारसा फरक पडत नाही, दुसरी थाप तयारच असते !..
******************************​******************************​******************************​****************


हिरवा!
बर्‍याच कारणांमुळे बदनाम झालेला हिरवा, प्रेमाच्या बाबतीत मात्र वेगळाच आहे. हिरवे प्रेमी गडद पण शांत असतात. त्यांना भांडण करायला आवडत नाही. आपल्या प्रेमीची चेष्टा करायला त्यांना प्रचंड आवडतं. त्यांना नाटकात काम करायलाही खूप आवडतं. गावातलं उत्सवाचं नाटकं असो, कुठल्या कंपनीचं नाटक असो किंवा खरं खुरं आयुष्य असो.

हिरव्या मुली रुसव्या फुगव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रेमजीवनातली पन्नाशी नुसती रुसण्यात जाते. त्या कशावरूनही रुसू शकतात. "त्याचा" दिवसातून चारदाच फोन येणे, त्याने दुसर्‍या मुलीकडे बघणे, पहिल्या भेटीची तारीख विसरणे, नवर्‍याने आपल्या माहेरच्या कुत्र्याचा वाढदिवस विसरणे, त्याने त्याच्या आईची स्तुती करणे यासारख्या घोर अपराधांना क्षमा नसते. त्यांना समजावता समजावता हाराकिरी पत्करलेल्या अनेक तरुणांना अभ्यास, नोकरी, व्यवसाय यांसारख्या अत्यंत वाईट सवयी लागल्याचे मी खूपदा पाहिले आहे.

दोन हिरवे आपोआपच एकत्र येतात. एकाने चेष्टा करणं आणि दुसर्‍याने रुसून बसणं यातच त्यांच प्रेम बहरतं !
******************************​******************************​******************************​**************


निळा!
निळे प्रेमी बर्फासारखे थंड आणि पाण्यासारखे चंचल असतात. त्यांना आपण कवी आहोत अशी पूर्ण खात्री झालेली असते. त्यामुळे कोणाला इम्प्रेस करायला ते कविता लिहितात आणि त्याला किंवा तिला वाचावयास भाग पाडतात. प्रत्येक कवितेत तु, तुला, तुझसाठी, ओठ, प्राण, फुला, भ्रमर असे नवकवींनी ओरबाडलेले शब्द १००% दिसतात. मग समोरच्यालाही "वा काय छान कविता आहे" असं झक मारत म्हणावं लागतं. बरं आणि हा कवितेचा खडा लागला तर लागला, नाही तर तोच ऊचलून दुसरीकडे मारायचा.
दोन निळे शक्यतो कधी कवी सम्मेलन भरवत नाहीत !
******************************​******************************​******************************​**************



पारवा !
पारवा रंग तुम्ही कधी पाहिला आहे का? पारवे प्रेमीही असेच अदॄश्य असतात. ते एखाद्यावर प्रचंड प्रेम करतात पण ती व्यक्ती समोर आली कि तोंडाला टाळं लागतं.

म्हणजे अशांना शाळेत वर्गातली एखादी मुलगी आवडते. शाळा झाली की तीच मुलगी ज्युनीयर कॉलेजला जाते. हा पण तिथेच दाखला घेतो. मग तिचे मित्र वाढू लागतात. पण "तिने एकदा माझ्याकडे बघून स्माईल दिली" यात त्याचं अख्खं वर्ष जातं. मग बारावी होते आणि ती सिनियर कॉलेज, मेडीकल किंवा इंजिनीरिंगला जाते. आपला हिरो मात्र बारावीतल्या मार्कांमुळे परत बारावी किंवा दुसर्‍या कुठल्याशा "क्ष" कॉलेजात जातो. खूप प्रयत्न करून तो तिचा नंबर मिळवतो, रिप्लाय येत नसूनही रोज मेसेज फॉरवर्ड करतो, पण तिला मात्र रोज कॉल करणारा कोणी भेटलेला असतो. पण याचं मात्र प्रेम काही कमी होत नाही. मित्रांबरोबर त्याला "ती" किती आवडते, फक्त हेच तो बोलतो. त्याचे मित्रही पारवेच असतात ! त्यांनीही कधिही न केलेल्या "अरे, तिला सिनेमाला येतेस का विचार", "तिला कॉफी साठी भेट की" किंवा "अरे डायरेक्ट विचारून टाक... हाय काय नी नाय काय.." अशा काही टिप्स देतात आणि स्वत:चा विरंगुळा करून घेतात. हा मात्र त्या सगळ्या गोष्टींचा सिरिअसली सिरिअस विचार करतो. असेच दिवस सरकत जातात आणि एक दिवस तिच्या साखरपुड्याची खबर कळते. काही दिवसांनी लग्नही होतं. "मै बस उसे खुष देखना चाहता हूं" हा डायलॉग कोणा पारव्यानेच लिहिलाय यात काही शंका नाही. काही दिवसांनी त्याला दुसरी कोणी "आवडवावी" लागते पण तिला मात्र तो कधीच विसरत नाही.

दोन पारवे आपणहून एकत्र येणं म्हणजे दोन लाजाळुच्या फांद्यानी एकमेकाला जोरात टाळी देण्यासारखं झालं. त्यामुळे पारवे एकत्र येण्यासाठी कोणा कॅटॅलिस्टची गरज लागते. पारव्यांचं एकत्र येण हे कोणा माणसामुळे किंवा घटनेमुळेच होऊ शकतं. म्हणूनच "लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात" यावर त्यांचा सोईस्करपणे विश्वास असतो.....
******************************​******************************​******************************​************


जांभळा !
जांभळ्यांचं प्रेम एकदम extreme असतं. प्रेमासाठी किंमती भेट देणे हे त्यांना आपलं कर्तव्यच वाटतं. दुकानात गेल्यावर ते प्रत्येक गोष्टीची पहिल्यांदा किंमत बघतात, मग सगळ्यात महाग वस्तू शोधून ती विकत घेतात आणि आपल्या मित्रांना आपण तिच्यासाठी किती "हज्जार" खर्च केले हे अगदी दिमाखाने सांगतात. त्यांना टापटीप रहायला आवडतं. ते अत्यंत आतल्या गाठीचे असतात. तांबड्यांसारखे धर की मार अशी पद्धत नसते. भगव्यांसारखे ते मजबूतही नसतात त्यामुळे ते diplomatically दुसर्‍याची वाट लावतात. पिवळ्यांसारखं भलत्याच ठिकाणी गुपचुप प्रेम करायला त्यांना आवडत नाही. एकांत हवा असेल तर ते कुठल्यातरी शांत पण भारी रेस्टॉरंटमधे जातात. हिरव्यांसारखी आपल्या प्रेमाची चेष्टा करायलाही त्यांना आवडत नाही आणि गंमत म्हणून कधी केलीच तर ते लगेच "Just Kidding" म्हणून पुढचे रुसवे फुगवे टाळतात. निळ्यांसारखी कविता करायला जमत नसली तरी चांगली कविता त्यांना नक्कीच ओळखता येते. अशी कुठली कविता त्यांना मिळाली तर ती कविता ते तिला किंवा त्याला फॉरवर्ड करतात. बस.. पारव्यांसारखे ते लाजरे नसतात. कोणी आवडलं की त्या व्यक्तीला ते डायरेक्ट विचारुन टाकतात.

दोन जांभळ्याचं एकत्र रहाणंही कठीण असतं. दोन जांभळे बर्‍याचदा प्रथम एकत्र येतात पण दोघेही extremist असल्याने भांडणं होतात. जांभळ्यांचं निळ्यांशी चांगलं पटतं कारण निळे शांत असतात. आठवड्यातून एकदा कविता वाचावी लागते एव्हढाच काय तो प्रोब्लेम....
..............................​..............................​.....



पांढरा |.....
"घरचा वैद्य" सारखी पुस्तकं वाचताना जसं प्रत्येक आजारातलं एकतरी लक्षण आपल्यात आहे असं वाटतं किंवा सगळ्या राशींचं भविष्य वाचताना..."अरे, मला असा अनुभव येतोय" असं वाटतं, तसं जर हे प्रेमाचे रंग वाचताना तुम्हाला वाटलं असेल तर नक्कीच तुम्ही पांढरे प्रेमी आहात.

काही पांढरे, प्रेमाचे सगळे रंग वापरुन संसाराचं छान चित्र बनवतात किंवा काहीजण जसे सगळे रंग मिळून पांढरा रंग होतो तसे कोरेच रहातात. प्रेमाची रंगपंचमी खेळूनही जर समोरचा "हो" म्हणत नसेल तर मग असे पांढरे मगाचच्या कवितेत हे शेवटचं कडवं जोडतात....

केले जरी हे सगळे, तुझसाठी तरी मी परका
रंगलो रंगात सार्‍या, तरिही कागद मी पांढरा |.....

आता तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा?
यापैकिच एखादा की सर्वातिल थोडा थोडा मिसळून इन्द्रधनुषी असा ??
सर्वांनी सांगितलं

तुझं मन तिच्यापुढे व्यक्त कर

डोळ्यांनी नव्हे तर

शब्दांनी सारं स्पष्ट कर

सल्ला आवडला माझ्या मनाला

उचलला फोन, तिला कधी भेटायचं विचारायला

नंबर तिचा फिरवला

मनाचा समतोअल बिघडला

खरंच का तु सांगु शकशील

तिच्या मनांत नसलं तर

उगाच चांगली मैत्रीण गमावशील

मनाची ही बाजु मनालाच पटली

एक बेल तिच्या फोनची वाजली

नकाराची घंटा माझ्या मनाची खणखणली

दुसरी बेल वाजण्याचे वेळच येऊ नाही दिली

असंच का तु जगशील

सांगितल्याशिवाय मानातलं तिला

कसं तु समजावशील?

भावना तुझ्या सा-या मनातल्या

सांगणं तुला नकार या पैकी

एकच उत्तर तुझे आहे

मनाचं द्वंद्व माझ्या आत चालू झालं

सकारात्मक - नकारात्मक भांडण सुरु झालं

लढाई फारच लांब रंगली

दोन्ही पक्षांच्या विचारांची हानी मात्र झाली

सरतेशेवटी सकारात्मकतेची बाजु जिंकली

उचलुन फोन करावा हीच

बाजु मनाला पटली

उशीर करणे योग्य नव्हते

फोन करणे जरुरी होते

सवयीप्रमाणे बोटे बटणांवर फिरली

लगेचच बेल होनची खणखणली

हॅलो म्हणुन समोरुन कुणीतरी बोलमं

आवाज ओळखीचा, म्हणुन हाय म्हटलं

कुशल मंगल सारं विचारलं

विषय कसा काढु हेच नाही कळलं

दोन्हीकडे मग शांतता पसरली

संधी चांगली होती झटकन स्विकारली

काहीतरी सांगणार आहे मी तुला

सांग लवकर काहीतरी ऐकायचय मला

तु सुंदर आहेस , आवडतेस मला

का ऐवढा वेळ लागला सांगायला तुला

तोंडावर पाण्याची धार कोसळली

गाढ झोपेतुन जाग मला आली

गुलाबी पहाटेची साखरस्वप्ने खरी ठरतात

हेच मला ती रात्र सांगुन गेली...
ओ.....ओ....ओ.... हर हर महादेव
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी.......
ओ....ओ....ओ.....
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी
झटकून टाक ती राख नव्याने जाग,
पेटू दे आग मराठी आता...
डोळ्यात फुटे अंगार भगव रक्तात,
जागू दे आज भवानी माता....
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी......
हर हर महादेव ||धृ||

प्रतीप्श्चंद्र लेखेव वर्धीष्णूर विश्वावान्दिता,
साहस्नोः शिवासैश्या मुद्रभाद्राय राज्यते,
हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश,
दाही दिशी घुमू दे शिवछत्रपतींचा घोष.........
जय भवानी......जय शिवाजी.........
लढण्या संग्राम आज हा,
बळ दे ह्या मनगटी आम्हा,
करण्या संहार शत्रूचा, जन्म घे पुन्हा आता
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी........... ||१||

असतोमां सदगमय: तमसोमां ज्योतिर्गमय:.......
मृत्योमा अमृत: गमय:,
उठा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा
मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त....
0.. स्स्स तलवार नाचते रणी
ऐसा पेटतो राग,जगा मारा जीव हा फुले
महाराष्ट्राची बाग,...........
जगण्या सिद्धांत आज हा,शक्ती दे शतपटी आम्हा,
चल चल रे ओठ घालती
साद मराठी आता,
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी.........||२||

झटकून टाक ती राख नव्याने जाग,
पेटू दे आग मराठी आता.....
डोळ्यात फुटे अंगार भगव रक्तात,
जागू दे आज भवानी माता....
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी........
हर हर महादेव
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी......
सरदार, राजपूत, ठाकूर ह्याप्रमाणे घाटी हा शब्दसुद्धा
अदबीने घ्यायला प्रवृत्त करा लोकांना
जय भवानी......जय शिवाजी.........
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी......||३||
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.

त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती.. तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती..
तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....

पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...

हा मॊडुन पडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने ठरवलं, ' तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे..'

या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला..मित्रांनी मदत केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवस पालटले..तो खुप श्रींमत झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.विरहाच्या आगीतुन,प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..ती सोडुन गेल्याची..तिनं नाकारल्याची..आपल्या गरीबीचा अपमान केल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती.

.एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं..त्याने गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ' तिचेच' आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली..त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत..त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं होत..तिला धडा शिकवण्याच्या..

अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.."

तिचाच फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच गेला कबरीकडे...तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....

ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही.तिला ' कर्करोग' झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होतए तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..
..
.

तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू जगलासं...
लहानपणापासुन त्याचं जगणं जरा जगावेगळंच होतं.
त्याला त्याचं असं एक आकाश हवं होतं की जिथं कोणाचेही कसलेही नियम नसतील.
कुठल्याही अटी नसतील.
कुठलही क्षितिज नसेल.
जिथं फक्त त्याची स्वप्न असतील....

स्वप्न ? .........काय असतात स्वप्न ?
जे आपल्याला घडावंसं वाटतं त्याला स्वप्न म्हणायचं का जे घडणार नाहीये त्याला ?

काहीही असो...
स्वप्न बघायला आणि ती पुर्ण होणार असतील तर करायला ताकद लागते.
त्याच्यात होती ही ताकद आणि त्याला आभिमान पण होता त्याचा.
एक दिवस ती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याला उमजलं की,
खरी ताकद पुर्ण करायला लागत नाही, ती लागते ते दुस-याची स्वप्न आपली मानुन पुर्ण करायला आणि त्या स्वप्नाळू जीवाला नविन स्वप्न द्यायला.

त्याच्या स्वप्नासाठी तीनी तिचं घरटं सोडलं आणि ती त्याच्या घरट्यात आली.
स्वप्न न बघणं एक वेळ सोप्प असतं पण सोडुन देणं खुप अवघड....
आपलं घरटं मागं सोडताना ती खुप काही सोडुन आली होती.....
खुप आठवणी... खुप क्षण...

तिच्या घरट्यात तिनी पहिल्यांदा डोळे उघडल्यानंतर, आईचे भरलेले डोळे बघुन
आईच्या कुशीत शिरल्याचा क्षण...
विजेच्या कडकडाटाला घाबरुन बाबांच्या कुशीत शिरल्याचा क्षण...
तिच्या इवल्याशा चोचीत आईनी भरवलेलातो मायेचा क्षण...
तिला उडता यावं म्हणुन तिच्या आईबाबांनी केलेल्या धडपडीचा क्षण....
तिनी पहिल्यांदा उडुन सगळं आकाश हिंडुन जग जिंकल्याचा क्षण...

त्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं,
पण ’आपण इतक्या सहज आपलं जग सोडु शकतो का ?’ हा प्रश्न त्याच्यामनात आला आणि...
त्याच्या घशाला कोरड पडली. विचार करण्याची त्याची हिंमतच होईना. त्याचे हात थरथरायला लागले. त्याचे डोळे शांत होते... शांत कसले सुन्न होते.
तिच्या उपकराच्या ओझ्याखाली दबलेला तो सुन्न डोळ्यातुन इतकंच म्हणाला की...
"तु हे सगळं कसं करु शकली ?"

ती म्हणाली,
" तुला नाही कळणार.... त्यासाठी बाई असावं लागतं ! "


मध्ये काही क्षण गेले...
ती होती म्हणुन कुठेही सुखात जगत होते. पण एकमेकांसोबत कुठेही जगणारे ते पिलासाठी मात्र असं कुठेही जगायला तयार नव्हते.
त्यांना पिलासाठी एक छानसं आणि मोठ्ठं घर द्यायचं होतं.
त्यामुळे जगाची यत्किंचीतही फिकीर न करणा-या त्या दोघांसाठी प्रत्येक काडीला किंमत होती.
पिलाला द्यायचं घरटं आता थोडंसं राहीलय, ह्या वेडानी भारावलेले ते शेवटच्या चार काड्या आणायला बाहेर पडले ते, पावसाळी हवा पडलीये हे माहित असुनही...
ती पिलाला छातीशी धरुन...
आणि तो, दोघांचं असणं हृदयाशी धरुन घरट्यासाठी घरट्याबाहेर पडला ते स्वप्नांचे पंख लाऊनच.
ह्या स्वप्नांचं थोडं विचित्रच असतं. जगावेगळं जग असतं ते...
त्याचे सुर वेगळे असतात.
गंध वेगळे असतात. त्यांचे ॠतु वेगळे असतात.

निसर्गाचे नियम त्याला ठाऊकच नसतात कदाचीत.
पण निसर्गाला तरी स्वप्नांचा हळवेपणा कुठे ठाऊक असतो ?
नाहीतर पिलासाठी जीव ओतुन गुंफलेल्या त्या घरट्यावर अशी वीज का कडाडली असती ?
ती वीज कडाडलीही इतक्या अमानुषपणे की हजारो पावसाळे पाहिलेला तो वटवृक्षही त्याच्याच आधारानी उभ्या असलेल्या वेलीला घाबरुन बिलगला.

पाउस पडायच्या आधिच त्याच्या भांबावलेल्या डोळ्यात त्यांच्या घराचं स्वप्न बुडत होतं.

त्याला माहितीच नव्हतं की स्वप्न ही एखाद्या नाजुक फुलांवर पडलेल्या दवबिंदुंसारखी असतात.
ती फक्त पहायची असतात.
त्यांना स्पर्श करायला गेलं की ती मातीत मिसळुन जातात.... .......फुलांसकट !

मातीचा गंध जीवाला वेडाउन टाकतो, ते उगाच नाही...
कारण तो कोणाच्या तरी स्वप्नांचा गंध असतो.

त्या ओल्या वातावरणातही त्याच्या घशाला कोरड पडली. विचार करण्याची त्याची हिंमतच होईना. त्याचे हात थरथरायला लागले. तो पुन्हा एकदा सुन्न झाला होता.
पिलाला छातीशी धरुन ती पुन्हा घरट्यापाशी पोहचली होती. तिनी एक क्षण.. एकच क्षण त्या घरट्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी घरटं सोडुन ती त्याच्याकडे झेपावली.
त्याचे थरथरते हात तिनी ओंजळीत धरुन त्याला शांत केलं आणि त्याला जवळ घेऊन ती घरट्यात परतली सुद्धा...

निसर्गाला स्वप्नांचा हळवेपणा ठाऊक नसतो तसं त्याचं सामर्थ्य पण माहित नसतं. फुलावरचं ते दवबिंदु साधंहललं सुद्धा नव्हतं.
तिचं पिल्लु सुरक्षित होतं. तो सुरक्षित होता. त्याचं घरटं सुरक्षित होतं.
पाचसाचं थैमान तिनं तिच्या पंखांवर थोपवुन धरलं होतं. ते तिघंही एकाच विश्वासानं तिच्याकडे पहात होते.
"तु हे सगळं कसं करु शकतेस ?" ह्या त्याच्या अपेक्षित प्रश्नाला तिनं नेहेमिचंच उत्तर दिलं.
"तुला नाही कळणार.... त्यासाठी बाई असावं लागतं !"



स्वप्न डोळ्यात असतात तोपर्यंतच ठीक असतं. ती एकदा श्वासात मिसळली की त्यांच्याशिवाय जगणंच कठीण होतं. आपण आपल्या पिलाला त्याचं स्वतःचं असं एक आकाश द्यायचं असं त्या दोघांनी ठरवलं आणि त्या दवबिंदुच्या ओझ्यानी फुलंच वाकलं.
पिलासाठीच पिलाला सोडुन त्यांना रोज लांब उडावं लागणार होतं.... ते ही पिलाला रोज दुस-याच्याच घरात सोडुन.... स्वप्न तुम्हाला मरु देत नाहीत, पण ती तुम्हाला जगुही देत नाहीत.
तिला तिच्या स्वप्नातलं आकाश खुणावत राहीलं आणि नऊ महिने आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण पिलाला जवळ ठेवणारी ती निग्रही झाली.
त्यांनी पिलाला त्या घरट्यात सोडलं आणि जड पंखांनी ते निघाले.
तो खुप अस्वस्थ झाला होता. त्याच्या घशाला कोरड पडली. विचार करण्याची त्याची हिंमतच होईना. त्याचे हात थरथरायला लागले होते. तो अजुन एकदा सुन्न झाला होता.
अशा वेळेला त्याला नेहेमीचाच एक आधार होता.... तिचा !

मोठ्या विश्वासानी त्यानी तिच्याकडे पाहिलं...पण...
पण ती स्वतःच कोसळली होती....... ........खचली होती. त्याच्यासाठी स्वतःचं घरटं सोडताना असलेली तिच्या पायातली ताकद संपली होती.
त्या निसर्गाला थोपवुन धरणारे तिचे पंख गळुन पडले होते.
ती रडत होती. खुप रडत होती.
तिची ही अवस्था बघुन तो उठला आणि पिलाला आणण्यासाठी निघाला.
ती म्हणाली, "थांब राजा, थोडंसं थांब. ते समोरचं आकाश खेचुन आणु आणि मग पिलाकडे येऊ. ते वाट बघत असेल आपली आणि त्याच्या आकाशाची. माझ्यावर विश्वास ठेव. आपल्याला जमेल ते."

त्याला कळेना... काहीच कळेना...
ना तिचं रडणं... ना खचणं... ना उठणं आणि ना उडणं.... तो म्हणाला,
" मला नाही कळणार... खरंच नाही कळणार... ह्यासाठी कदाचीत बाई असावं लागेल. "

ती म्हणाली,
खरंय तुझं... तुला नाही कळणार... कारण हे कळायला बाई तर असवं लागेलच पण त्याही पेक्षा आई असावं लागेल."



कुठलाच पुरुष कधी बाई होऊ शकत नाही, .... आई तर नाहीच नाही !
मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो
लाल मिरची हिरवा देट वेळ मिळाली की देवळात भेट

झाडाला फुल नाही तर पाणी घालतिस कशाला

मनात प्रेम नाही तर बघून हसतिस कशाला.

बटन मारल्या शिवाय
लाईट पेटत नाय

डोळा मारल्या शिवाय
पोरगी पटत नाय. ;-)
अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी
कोण जाणे ती परी दिसते तरी कशी
आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा
पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या
बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं
का कोण जाणे काय जादू आहे तुज्यात...
कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात
तुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं
बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान
तुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...!
प्रत्येकाला असते आई.
जी सेवा करते आपुली खुप परिश्रम करते आपुल्यासाठी.
तरी स्मित असते तिच्या ओठी.
ती आहे आपुली आई.
सर्वाची माऊली
पित्याहुन आवडते आई.
जी देते जगाला सावली.
गुरुची गणणा होते.
देवापासुन सुरु
त्याच्या आधी असते.
आपली मायगुरु
आपल्यावर अंनत उपकार आहे त्या आईचे.
मरुनही फेडु शकत.
उपकार त्या मायेचे.
"आ" म्हणजे आत्मा.
"ई" म्हणजे ईश्वर.
याचा संगम म्हणजे आई.
भरभरुन आर्शिवाद
आपल्याला देई
कशी करु मी तिची उतराई.
माझी प्रिया
जराशी हासरी
जराशी लाजरी

वर्णाने सावळी
डोळ्यांत काजळी

रूपाने गोजिरी
थोडीशी बावरी

केसांच्या बटांना
जागा चेहऱ्यावरी

हाती कंगणांचा
खणखणाट भारी

थोडीशी लहरी
माझी स्वप्नपरी

हास्य तिचे असे
जणू निर्झरापरी

अशी माझी प्रिया
सर्वांहून न्यारी
बापानं खस्ता खाल्ल्या म्हणून सारं घर दोन वेळेस पोटभर जेवलं.
त्यानं दिवस-रात्रं एक केले म्हणून, घर सारं सुखानं निजलं.
नोकरी करुनही रात्री त्यानं रीक्षा चालवली.
त्यानं मीटर डाऊन करुन दिवसेंदिवस वाढणारी आमची प्रत्येक गरज भागवली.
तापानं फणफणलो कधी तरी आईच्या डोळ्यांत टचकन पाणी यायचं.
पण वरवर कठोर दिसणाऱ्या बापाला मात्रं दोन घास जेवण करणही मग जड जायचं.
ऎन उमेदिचा काळ त्यानं हौसमौज न करता आमच्या संगोपनात घालवला.
खिशाला शिमगा असला कधी तरी आम्हाला मात्र नेहमीच त्यानं दिवाळसण दाखवला.
स्वतःच्या बापासमोर तोंडही न उघडणारा आमचा बाप, माझ्याशी मात्र कुठल्याही विषयावर मनमोकळ्या गप्पा मारतो.
त्याची आवड कधीही आमच्यावर न लादता, आमच्याच आवडीनं जगण्याचा आग्रह तो आमच्याकडे धरतो.
लहाणपणी राग अनावर झालाच जर कधी तर गालावर पाच बोटं तो उमटवायचा.
पण त्याच रात्री घरी येताना मला आवडतं म्हणून खायला बटरस्कॉच आईस्क्रिम आणायचा.
पोराला ईंजिनियर बनवायचं स्वप्नं बघताना, प्रसंगी स्वतः दुकानात काम करतानाही लाज नाही वाटली त्याला.
पण पंनास हजार फी भरुनही, नापास झाल्यावर, पहिलीच चूक म्हणून मोठ्या मनानं माफ केलं त्यानं मला.
शाळेत असताना कॅमलची कंपास आवडूनही बघायलाही नाही मिळाली त्याला, पण आम्हाला हवी ती गोष्ट मिळाली नाही असं कधीच नाही घडलं.
गाडी,मोबाईल आणि सगळा ऎशआराम पुरवला त्यानं, पण कुठलीच गोष्ट आमच्याकडे नाही म्हणून आमचं कधीच नाही नडलं.
आमचा बाप कडक शिस्तीचा आहे, असं मित्रांना सांगताना आम्ही कुत्सितपणे हसतो.
पण रात्री तासभर ऊशीरा पोहोचलो घरी तर, येईल गं, म्हणून आईला समजवताना तोच बाप स्वतः मात्र वाटेकडे माझ्या डोळा लावून बसतो.
"आई" घराचं सौभाग्य असली तरी "बाप" म्हणजे घराचं अस्तित्व असतं.
बापाशिवाय कुठल्या घरालाही घराचं असं स्वत्व नसतं.
एक माणूस म्हणून भले त्याच्या जीवनांत असेल तो सर्वांसाठी सामान्य.
पण आदर्श बापाचं मूर्तिमंत ऊदाहरण असंच असावं हे त्याच सर्वांना आहे मनापासून मान्य.
वय वर्ष्रे ५८, तरी आमचा बाप अजून न थकता कष्ट ऊपसतोय.
त्याला सुखी-समाधानी बघायचं आहे म्हणूनंच मी ही शोधतोय मला कुठे सूर आता गवसतोय.
बापानं खस्ता खाल्ल्या म्हणून सारं घर दोन वेळेस पोटभर जेवलं.
त्यानं दिवस-रात्रं एक केले म्हणून, घर सारं सुखानं निजलं.
नोकरी करुनही रात्री त्यानं रीक्षा चालवली.
त्यानं मीटर डाऊन करुन दिवसेंदिवस वाढणारी आमची प्रत्येक गरज भागवली.
तापानं फणफणलो कधी तरी आईच्या डोळ्यांत टचकन पाणी यायचं.
पण वरवर कठोर दिसणाऱ्या बापाला मात्रं दोन घास जेवण करणही मग जड जायचं.
ऎन उमेदिचा काळ त्यानं हौसमौज न करता आमच्या संगोपनात घालवला.
खिशाला शिमगा असला कधी तरी आम्हाला मात्र नेहमीच त्यानं दिवाळसण दाखवला.
स्वतःच्या बापासमोर तोंडही न उघडणारा आमचा बाप, माझ्याशी मात्र कुठल्याही विषयावर मनमोकळ्या गप्पा मारतो.
त्याची आवड कधीही आमच्यावर न लादता, आमच्याच आवडीनं जगण्याचा आग्रह तो आमच्याकडे धरतो.
लहाणपणी राग अनावर झालाच जर कधी तर गालावर पाच बोटं तो उमटवायचा.
पण त्याच रात्री घरी येताना मला आवडतं म्हणून खायला बटरस्कॉच आईस्क्रिम आणायचा.
पोराला ईंजिनियर बनवायचं स्वप्नं बघताना, प्रसंगी स्वतः दुकानात काम करतानाही लाज नाही वाटली त्याला.
पण पंनास हजार फी भरुनही, नापास झाल्यावर, पहिलीच चूक म्हणून मोठ्या मनानं माफ केलं त्यानं मला.
शाळेत असताना कॅमलची कंपास आवडूनही बघायलाही नाही मिळाली त्याला, पण आम्हाला हवी ती गोष्ट मिळाली नाही असं कधीच नाही घडलं.
गाडी,मोबाईल आणि सगळा ऎशआराम पुरवला त्यानं, पण कुठलीच गोष्ट आमच्याकडे नाही म्हणून आमचं कधीच नाही नडलं.
आमचा बाप कडक शिस्तीचा आहे, असं मित्रांना सांगताना आम्ही कुत्सितपणे हसतो.
पण रात्री तासभर ऊशीरा पोहोचलो घरी तर, येईल गं, म्हणून आईला समजवताना तोच बाप स्वतः मात्र वाटेकडे माझ्या डोळा लावून बसतो.
"आई" घराचं सौभाग्य असली तरी "बाप" म्हणजे घराचं अस्तित्व असतं.
बापाशिवाय कुठल्या घरालाही घराचं असं स्वत्व नसतं.
एक माणूस म्हणून भले त्याच्या जीवनांत असेल तो सर्वांसाठी सामान्य.
पण आदर्श बापाचं मूर्तिमंत ऊदाहरण असंच असावं हे त्याच सर्वांना आहे मनापासून मान्य.
वय वर्ष्रे ५८, तरी आमचा बाप अजून न थकता कष्ट ऊपसतोय.
त्याला सुखी-समाधानी बघायचं आहे म्हणूनंच मी ही शोधतोय मला कुठे सूर आता गवसतोय.
रे भारता !
रे भारता ! कोण करेल आता तुझी रे रक्षा !
नशिबी तुझ्या यवनांचे राज्य आणि
दुबळ्या भारतीयांची दुबळी नीती
कोण कुठली बाई पण
आज आहे तुझी अन भिशिक्त राणी
आणि लेकुरे तिची आज बोलत आहेत
शब्द त्याग आणि सेवेचे
व्यर्थ वाटते आज बलिदान त्या
नर वीरांचे आणि देश प्रेमींचे
अरे रडत असतील आज स्वर्गात
ज्यांनी केले तुझ्या साठी
बलिदान अपुल्या प्राणांचे
कोठे आहेत आज वंशज त्या
वीर अभिमन्यू आणि अर्जुनाचे
कोठे आहेत आज मावळे त्या
तानाजी आणि shivajiche
आज दिसतात सगळीकडे फक्त
अवलादी देशद्रोही आणि स्वार्थ प्रेमींच्या
आज का खवळून नाही उठत
सेना स्वाभिमानी मनगटाच्या
आणि का दिसत नाहीत आज
लेकी राणी झाशीच्या
वांझ झाल्या का रे आज
कुशी वीर मातांच्या
कधी होणार रे सूर्योदय
तुला तारणार्या दिवसाचा
आणि कधी रे होणार अंत
या निर्लज्ज आणि नालायक
राज्य सत्तेचा !
मी म्हंटल 'अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसविण्यासाठी,तुझी अश्रू पुसण्यासाठी
तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा'
तीनेही लाजत म्हंटल 'हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे
मग कसं कोण जाने, ती माझ्या मिठीत विरून गेली,
वीरगळून गेली, अगदी माझ्याही नकळत
आता मी; मी राहिलो नव्हतो, न ती; ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती.
मग न जाने का, नजर माझीच लागली.
मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत
त्या भाबडीने हात तिचा कापला होता
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता
पुन्हा येऊन पाहून जा ग
पत्रिका आहे आपल्याच लग्नाची
सोंग केलं होतं ग मी सारं
फक्त तुला जळवण्यासाठी
ग प्रिये थोडं जळवण्यासाठी
आज तिच्या सोबत माझही प्रेत जळतंय
जीव सोडला आहे
तरीही काळीज रडतंय
काळीज रडतंय...
धर्मनिरपेक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज
धर्मनिरपेक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज

आदिल्शाचे सरदार शहाजी महाराज

शिवाजीचा नौदल प्रमुख दौलत खान

शिवाजीच विश्वासू नौकर -मदारी मेहतर

अफझलखानाचा वकील -कृष्णाजी भास्कर

शिवाजीचा वकील -काजी हैदर


औरंगजेबाचा सरदार -मिर्झाराजे जयसिंग

शिवाजीचा तोफागोल्याचा सैन्य प्रमुख -इब्राहीम खान

शिवा -न्हावी

किल्याचा प्रमुख महार

हेर -बेहार्जी - रामोशी

समुद्र नौकांचा सरदार
प्रेम हे होतनसत
प्रेम हे करावलागत
आपल अस कुणिचनसत
आपलस कराव लागत
एकदा तरी स्वताहुन
वादळात झोकायचअसत
नाहिच हाती आलतर
त्याचवादळात
मनसोक्त मरायला शिकायचअसत
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ..
दोन मनाचा फक्त शब्दांचा मेळ,
दोन हृदयाचा फक्त तालमेल,
दोन भावनांचा फक्त फक्त मेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.
दूर असून सुद्धा जवळ असण्याचा मेळ,
फक्त अवाजावारून दुःख ओळखन्याचा मेळ,
ती नाराजी ओळखन्याची खेळ,
ती वेळ साधून प्रेम करण्याचा खेळ,
सारा सारा फक्त भावनांचा खेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.
माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण कोणते असेल तर ते म्हणजे
"अपेक्षा."
जन्माला आल्या आल्या त्या तान्हुल्या बाळाकडून आपणा अपेक्षा करायला सुरुवात करतो.
ज्याने पण अ,आ,इ,ई हि बाराखडी बनवली ना त्याने पण मुद्दामच "अ" हे अक्षर पहिल्या क्रमांकावर लिहिलेय.
जेणेकरून लहान मुल जेव्हा शाळेत जाईल आणि बाराखडी शिकेल तेव्हाच त्याला पहिल्यांदाच कळेल कि
"अ" कश्यातला???........."अपेक्षा" मधला.
"आ" कश्यातला??.........."आशा" मधला .
अपक्षांचे ओझे दोघांनाही जगू देत नाही,
"ज्याच्या कडून अपेक्षा केली जाते" त्याला सुद्धा
आणि
"जो" अपेक्षा करतो त्याला सुद्धा.

आयुष्यात दोनच गोष्टी असतात.
एक "देणं" आणि दुसरे "घेणं"
पण.....
"देणं" हे बहुतेकदा दुर्लक्षित करायचे हे ठरलेले असते
आणि
"घेणं" हे हक्काचे मानलेले असते.

"देणं" हे नुकत्याच झालेल्या ताज्या जखमेसारखे असतं,नेहमी बोचत राहणारं आणि त्यामुळे सारखे लक्षात राहणारं
आणि "घेणं" हे विस्कटलेल्या केसासारखे असतं,कशी चुकून आरश्यात पाहिलं तरच लक्षात येणारं.
एक साधं उदाहरण घ्या ना,
तुम्ही मित्राला १०० रुपयांची नोट उधार दिली तर ती चांगली लक्षात राहते
आणि तिचा नोट तुम्ही उधार घेतली,कि ती सहसा विसरायला होते.

किती हा शब्द "सुख,दु:ख,आनंद,त्रास,समाधान" यांसाठी नसतोच,
"सुख,दु:ख,आनंद,त्रास,समाधान" या भावनांसाठी एकक नसते,
किती सुखी आहेस?......किती दु:ख होतंय?.....किती समाधानी आहेस?
काय उत्तर देणार या प्रश्नांचे????
परमेश्वराने ना संपणारे आभाळ बनवले ना ते ह्याच कारणासाठी बनवले असेल बहुतेक,जेणे करून तुम्ही या प्रश्नाची उत्तरं देऊ शकाल,
किती सुखी आहेस?......किती दु:ख होतंय?.....किती समाधानी आहेस?
असा प्रश्न कुणी विचारले ना कि,त्या आभाळाकडे बोटं दाखवायचे आणि उत्तर द्यायचे.
"त्या" आभाळा एवढा सुखी आहे.
"त्या" आभाळा एवढं दु:ख आहे.

आपल्याला कुणी विचारले ना कि,"काय हवंय तुला?".कि आपण मनाला विचारतो,
आणि मग मन एक यादी जमा करून देते,
पुन्हा समोरच्या व्यक्तीने विचारले,"इतकच हवय ना?अजून काही नको ना?"
मग पुन्हा आपण मनाला विचारतो,
आणि मग मन पुन्हा अजून एक छोटीशी यादी आणून देतं.
खरेतर
प्रश्न पण छोटा असतो आणि त्याचे उत्तर पण छोटे आणि सोप्पे असते.

प्रश्न असतो,"ये मना,तुला काय हवंय?"
आणि
उत्तर असते,
"सगळं".
नात मैत्रीचं ...
ना रक्ताच ना वचनात अडकलेलं
ना ठरवलेलं ना ठरवून केलेलं
नात मैत्रीचं ... ...

मन मोकळ्या मनाचं ..
विचार स्वातंत्राच ..
हव ते बोलण्याचं .
नात मैत्रीचं ... ...

कधीच न तुटणार ..
तुटल तरी जुडणार ..
जीवनाचं अर्थ सांगणार ...
नात मैत्रीचं ... ...

आजन्म सोबतीच ..
एका हाकेच ..
सुख दुक्खाच ...
आपल्या हक्काचं...
नात मैत्रीचं ... ...

प्रतिक आरशाच ..
जुळ्या भावांच ...
एकाला ठेच ...
दुसऱ्याला लागायचं ...
नात मैत्रीचं ... ...

जगायला शिकवणार ...
पाठीशी उभ राहणार ...
सर्व चुका माफ करणार...
दिलदार म्हणवणार ...
नात मैत्रीचं ... ...
आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या...
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत:
आयुष्यभर हरत राहिला तो - बाप
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं
मानत आली ती - आई
आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न ...........



वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं..

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं

म्हणाली, चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतो

चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?

टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला

नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला

आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण

दुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण

मग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं

विचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं

एक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?

Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?

शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी

प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी

लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटली

हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली

प्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते

कारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,

ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असते
ती दिसली.....
भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....

तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....

तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....

कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, सार मनात गेले शब्द राहून.....

इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....

नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या कविकुमारची........
आठवणीच्या वादळामध्ये गुरफटलो असताना
डोळ्यातून अश्रू वाहत असतना.
अन तिचा फोन आला....................

उचलून कानाजवळ आवाज ऐकताना
बंद होवून जातो hello बोलताना.
अन तिचा फोन आला ..................

दुखवलेल्या मनाला कसेतरी सावरताना
अश्रू पुसत मग फोन लावताना.
अन तिचा फोन आला....................

चमकून जाते विज शब्द तिचे ऐकताना
कसं जगावे जिवन आयुष्यात ती नसताना.
अन तिचा फोन आला...........................​.......

स्वताच्या लग्नाची बातमी सांगत होती
रडू नका एवढे सांगायला विसरली नव्हती.
अन तिचा फोन आला....................

प्रत्येक वर्षी त्यादिवशी वाटते फोन बंद करावा
भिती वाटते येणारा फोन तिचा तर नसावा.
अन तिचा फोन आला....................
अधुरी एक कहाणी कधी पूर्ण होईल का?

अधुरी एक कहाणी कधी पूर्ण होईल का?
एकमुलगी होती साधी सरळ
थोडीसी खट्याळ ....नेहमी स्वप्नानाच्या दुनियेतरंगलेली....आणि एक
मुलगा होता स्वाभिमानी हुशार
नेहमी स्वतःमध्येगुंतलेला ....अशीच
...दोघांची एकदा ओळख
झाली .....आणि त्यांची छान

मैत्रीझाली....त्यातूनच त्याचं फोन
call आणि sms चालू
झाले....ती मुलगी रोज त्यामुलाला फोन
आणि sms करायची....जर ती त्याला एक
दिवस जरी फोन किंवा smsनाही केला तर
तो तिच्यावर
रागवायचा .तिला विचारायचा " का ग काल

तू फोन नाहीकेला मी वाट पाहत
होतो तुझ्या फोनची ".ती त्याला त्याला म्हणायची कि "नाही sorry
काल नाही जमल फोन
करायला ".तिच्या ह्या उत्तरावर
तो समाधानीनसायचा... त्यातूनच
तो तिला साधपण दाखवायचा...रोज त्यांचे

फोन आणि smsचालू
राहिले ...त्या मुलीला त्याच्याशिवाय
करमत नसे...तिने किती हि ठरवलंकि आपण
त्याला जास्त sms
नाही करायचं...तरी हि त्याला sms
केल्याशिवायतिला करमत
नसे ..ती त्याला sms करायची...... त्याचं
बोलन वाढू

लागलहोत ....ती एकटी असली कि त्याचाच
विचारात गुंतायची...किती हि ठरवलं
कि नाहीत्याचा विचार करायचा तर हि ....
ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत
जातहोती....कारण ती त्याच्या प्रेमात
पडली आहे हे तीच तिलाच
कळलनाही ............त्याच्या विचारात

असताना त्याचे बोलण आठवून स्वतःशीच
एकटीहसायची ....गाण गुणगुणत बसायची."
पाहिले न मी तुला, तू मला न
पाहिलेना कळे कधी कुठे मन वेडे
गुंतले "आतातिला त्याची सवय
झाली होती....सतत त्याच्याशी बोलावस
वाटायचं...

आणि तिलात्याच्यशी बोलल्याशिवाय
राहवत नसे ....त्याच्या आवाजात
ती आनंदीव्हायची....हळू हळू ती त्याच
पण हि ओळखू लागली होती.... त्याच मूड कस
आहे?.. का आहे ?
ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत
होते ..तो तिलाविचारायचा..." अग तुला कस

कळल कि माझ मूड खराब आहे
ते ...?.ती त्यालाम्हणायची "
मैत्री केली आहे.... थोड फार तरी कळू
शकत "..अशाने तीत्याच्यात आणखी गुंतू
लागली...त्याच्याशिवाय तिच्या मनात
कोणी नसे.....तिलात्याच्याबद्दल सगळ

माहित आहे होत.... तो कसा आहे ?
त्याचा स्वभाव कसा आहे? त्याच
दिनक्रमच तिला माहित झाल
होत ..तो कधी जेवतो....
घरी किती वेळअसतो... मित्रान बरोबर
किती वेळ
असतो ...कधी झोपतो कधी उठतो..तिला हि वाटतहोत
कि तो तिच्यावर प्रेम करत आहे..... पण

तस काही नव्हते.असचएकदा तिने
त्याला फोन केला....दोघांच्या पण
गप्पा छान
रंगल्या होत्या..आता तिला त्याच्या मनातल
जाणून घ्यायचं होत....पण
काही केल्या तिला तेजमत नव्हते...मग
त्यानेच तिला विचारले " तू लग्न

कधी करतेस ?".त्यावर तीचटकन
त्याला म्हणाली..." छे ! एवढ्यात लवकर
नाही अजून वेळ आहे बघू "....मगतीने
त्याला विचारलं " तू कधी करतोस
लग्न"..तो तीला म्हणाला "
मी लग्नकरणार नाही. मी एकटाच

बरा आहे..".ती खूप दुखी होते...
काही क्षण तिलाकाहीच सुचत
नाही ..हा असा का बोलत आहे..पण
स्वतःला सावरून ...
ती परतत्याला विचारते... " तू
असा का बोलत आहे .... तुझ्या आयुष्यात
काही घडलआहे का?"..तो अपसेट होऊन

तिला म्हणतो " होय , आणि आता मला कोणीच
नको मीएकटाच बरा आहे खूप सुखी आहे
". त्याच्या आयुष्यात खूप काही घडल
आहे असेतिला वाटू लागल..मग ते दोघे
तो विषय बदलून दुसर्या विषयावर बोलू
लागतात ... आणि ती त्याच

कोमजलेला चेहरा फुलवते..." सांग
कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!
रंग कधी दिसणार
तुला लाजणाऱ्या फुलातला ?"तिचा हा स्वभाव
त्याला खूप आवडत... तो नकळत तिला बोलून
जातो. "तू खूप चांगली आहेस... तुझ

चांगलच होईल..."पण ती मनातल्या मनात
म्हणत असे..... माझे चांगले होईल पण
जेव्हा तू माझ्या सोबत असशील"करण
ती त्याला दुखी पाहू शकत
नव्हती ........आता तिला तीच प्रेम
व्यक्त करण जमत नव्हते...अजून हि ते

दोघे तसेच रोज बोलत आहे....रोज फोन
आणि sms चालू आहे....त्याला कळत
नव्हते ती त्याच्यावर जीवापाड प्रेम
करत आहे एका निष्पाप
मनानेतिला अशा आहे कि आज न
उद्या त्याला तीच प्रेम
कळेल ..आणि ती त्याला सगळ सांगेल.....पण

अजून
हि तो मुलगा तिला काही बोलला नाही....
ती वाट पाहत आहे
त्याची .....आणि स्वतःला प्रश्न करत
बसले आहे ..." प्रेमवेडी राधा, साद
घाली मुकुंदालपसी कोठे गोपाळा,
गोविंदा...तिला मिळेल का त्याच
प्रेम..................?

आपल्या भावना ती व्यक्त करू शकेल
का त्याला ....?का अशीच वाट पाहत बसेल
त्याची ....? माझी
ही अधुरी एक कहाणी पूर्ण होईल का? आणि त्या मुलीने काय केल पाहिजे की
त्या मुलाला तिचे प्रेम समजले पाहिजे कृपया आपल्या उत्तराची वाथ बघत आहे
स्वप्नांत माझ्या तू येशील का?
हातात हात तु देशील का?
प्राणप्रिया माझी तू होशील का ?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

थंडगार वारा कानात हळूच सांगे,
रममाण व्हावे मी प्रिये तुझ्यासंगे ,
हृदयात जागा मला देशील का ?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

वाटे पक्षापरी उडून तुझ्याजवळ यावे ,
नि:सुंदर ते रूप तुझे पाहतच रहावे ,
मनाची राणी तू होशील का ?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

सर्व दु:खे विसरुनी जाऊ ,
सुखी जीवनप्रवास कापत राहू ,
सुखदु:खात साथ तू देशील का?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

हृदय माझे पण प्रत्येक श्वासात तू ,
शरीर माझे पण त्याची आत्माच तू ,
अर्धांगिनी माझी तू होशील का ?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

जगी सर्वसुखी संसार आपला होईल ,
बंधनरूपी प्रेमाचे प्रतिक गणले जाईल ,
जन्मभर हे बंधन तू निभवशील का?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?
माझ्या आयुष्यात येणारी परी
खरच कशी हो असेल?
माझ्या इवल्याशा साम्राज्याची
खरच का सम्राज्ञी ती शोभेल?

नाकी डोळी रेखीव असेल की
मनानेही तेवढीच सुंदर असेल?
माझ्या इवल्याशा घरट्याला का
आपल मानणारी असेल?

शृंगार करणारी असेल की
कंबरपण कसणारी असेल?
संसाराच्या गाड्याला ती का
अखंड साथ देणारी असेल?

खूप बडबड करणारी असेल का
माझही कधी ऐकून घेणारी असेल?
मी लपविलेल्या अश्रूना का
पदरात पाडून घेणारी असेल?

असे खुळे प्रश्न सध्या
काळ्या आकृतींना विचारतोय
मित्रसुद्धा चेष्टेने विचारतात
"मधेच कोणाशी बोलतोय?"

काय सांगू त्याना मी
तुझीच वाट पाहतोय
जिला कधीच पहिले नाही
तिच्यावर जीवपाड प्रेम करतोय
कधी काळी सदैव माझ्यासोबत राहणारी,
तर कधी माझ्या नजरेला नजर देणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडणारी,
तर कधी माझ्या स्पर्शानी मोहरून जाणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी माझा तोल जाताच मला सावरणारी,
तर कधी इतर मुलीँकडे पाहिले म्हणून रुसणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी मला आनंदी पाहूऩ समाधानी होणारी,
तर कधी मला दु:खी पाहून अश्रु ढाळणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी हा जन्म तुझ्यासाठीच घेतला असे म्हणनारी,
तर कधी मरेपर्यँत तुझीच राहील असे वचन देणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी मी सिगारेट ओढली म्हणून अबोला धरणारी,
तर कधी मी दारू प्यालो म्हणून माझ्याशी भांडणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी त्या व्यसनांपासून दूर रहा असा सल्ला देणारी,
तर कधी त्या व्यसनी मित्रापासून दूर रहा अशी सक्त ताकिद देणारी,
ती आज मात्र 'त्याच' मित्रासोबत निघून गेली....
आयुष्य म्हणजे नेमक काय याचा विचार केला तर जाणवत की, लॉटरीच तीकीटच की..! गावी शेजारी एक अशिक्षित आजोबा राहतात. आजोबा प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला १ रुपयाचं लॉटरीच तिकीट विकत घेतात. बक्षिसाची रक्कम असते १५ लाख रुपये. दर महिन्याच्या १५ तारखेला लॉटरीच्या... टपरी वर जाऊन लॉटरी लागली का ते पाहतात. लॉटरी लागली नाही तरी येताना पुन्हा १ रुपयाचं तिकीट घेऊन येतात. आजपर्यंत १० वर्ष झाली. पण एकदाही आजोबाना ...लॉटरी लागली नाहीये. एकदा न राहवून मी विचारलं "आजोबा...कशाला खर्च करता लॉटरीवर...! इतक्या वर्षात एकदाही लागली नाहीये....!" आजोबा मंद हसले...आणि म्हणाले .."बाळा..लॉटरी लागावी म्हणून मी तिकीट नाही कधी काढत..१ तारखेला लॉटरीच तिकीट काढला की १५ तारखेपर्यंत मी मला १५ लाख मिळाले तर काय काय करेन याची स्वप्न पाहतो. १५ तारखेला लॉटरी लागली नसली की पुन्हा १ रुपयाचं तिकीट काढतो..आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत स्वप्न पाहतो...! असा २ रुपयात माझा प्रत्येक महिना छान जातो...! बाळे ही स्वप्नच मला जगायची उमेद देतात......!" " स्वप्नात मी आज्जी बरोबर सगळे देश फिरून येतो...रोज सकाळी लंडन मधे तर रात्री पॅरीसच्या टॉवर वर आम्ही कॉफी घेतो...जिवंतपणी आजीला कधी मुंबईला पण नेऊ शकलो नाही..पण आता मात्र तिला सगाळीकेडे नेतो...तिला हवा ते घेऊन देतो...कालच मला म्हणाली की जीन्स ची पॅंट आणून द्या...! " "दुसर्याना त्रास न देता मनातल्या मनात स्वप्न बघितली तर काय वाईट ...? " मी म्हणाले..."आजोबा पण स्वप्न मोडली की त्रास नाही का होत...?" आजोबा म्हणाले.."अगो..मग लॉटरी लागेपर्यंत वाट पाहायची आणि वाट पाहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून नवीन स्वप्न बघायची...२ रुपयात..महिना छान घालवायचा..."
तान्ह्या बाळाची डायरी
३ जून. मी आईच्या गर्भात आहे. आईने बाबांना हि गोड बातमी दिली. बाबा खुश झालेत.
८ ऑगस्ट. मला पिटुकले हातपाय, डोके आणि पोट आहे.
१४ सप्टें. माझ ultrascan झाल. किती छान! मी मुलगी आहे.
१५ सप्टें. मी मृत झालेय, माझ्या आईवडिलांनी मला मारलय
का? मी मुलगी होते म्हणून? सर्वांना आई हवी असते, लग्नासाठी बायको हवी असते, प्रेम करायला प्रेयसी हवी असते, मग पोटी, मुलगी का नको असते? समंजस बना, नुसते सुसंकृत नको.

कदाचित आता तुमचे विचार बदले असतील
कॉलेजमधे अनेक सुंदर मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

कॉलेजमधे मुली जीन्स घालुन येतात,
पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

कॉलेजमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

प्रेम सगळे करतात
पण आयुष्यभर जी कुठ्ल्याही परीस्थीमध्ये
जी प्रेमाने साथ् देते
ती मुलगी मराठी असते…..
kavita karane Sopp ki PREM...?
Kavita chukali tar Kagad Fadta yeto,
Pan...
PREM chukkal tar,
Aayushyachya Patravalya Hotat...!
Right mitrano.....
असाव कुणीतरी…..
तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..
असाव कुणीतरी…..
सकाळी साखरझोपेतुन उठवणारी,
आणी तो चेहरा बघुन माजी क्षणात झोप उडावी….
असाव कुणीतरी…..
प्रेमाने सकाळी चहा करून देणारी ,
आणी केविल्वान्य डोळ्यानी माज़कडे पाहत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
मी जवळ नसतानामाज्या सोबत घालवलेल्या,
प्रतेक क्षणाची आठवण काढत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
एकदा तिला सहज म्हट्ल,
तु सोबत असलिस कि मला जग छोट वाट्त,
लगेच म्हणाली विकत घेउन टाक,
मि सोबत नसले कि ज्यास्त भावात विकुन टाक.

* एकदा तिच्या जवळ बसुन
तिला म्हट्ल,
तुझे डोळे खुप खोल आहेत.
चावट पणे म्हण्ते कसे .
थोडा लांब सरकुन बस पडशील
. ....तिला म्हट्ल
पण मला पोहता येत
म्हन्ते कशी.
प्रयत्न करुन बघ
कित्येकाना असच वाट्त होत.

* तिला एकदा सहज विचारल
तुल भिति नाहि वाट्त
आपल्याला कोणि बघेल याचि.
काय म्हणालि असेल ?
वाट्तेना कोणि बघेल याचि!
आणि कुणिहि बघत नाहि याचि हि.
हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
आणि लग्न होणार
असलेल्यांनी ......
नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी
आलो ते मनाशी काही ठरवूनच. जेवताना मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "मला
तुझ्याशी काही बोलायचं आहे." तिच्या डोळ्यांत वेदना उमटली; तरीही ती शांतपणे जेवत
होती, सगळे शब्द जुळवून मी तीलासांगितलं, मला घटस्पोट हवाय."
तिने शांतपणे
विचारल,- "का?" तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली. समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय आहे, हे तिल जानुनघ्यायच होत; पान माज़् मन दुसर्य स्त्रीवर
आलय हे मि तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो. माझा बँक बलन्स, कार, घर, सगळ मी तिला
देऊ केलं: पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले. दुसऱ्या
दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला. तिला माझ्याकडून
काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि या एक महिन्यात दोघांनीही
नॉर्मल रहावं अशी तिची इच्छाहोती. तिची कारणे साधी होती. महिन्याभरातआमच्या मुलाची
परिक्षाहोती आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता. तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत. त्याप्रमाणे रोज
महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती. मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना
व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक
दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला
नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम
पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही
फार अवघडून गेलो. मी तिचा हात धरून बेडरूम
पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला. दुसया दिवसी ती
माझ्या छातीला टेकून होती. आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस नीटबघितलेच नाही हे मला
जाणवलं; आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा
अचानक निर्णय का घेतोय असा प्रश्न पडला. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून
किंवा सोबत बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला
जाणवलं. रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं तीच वजन कमी झालंय.
हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसागणिक तीच कमी होणारं वजन माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच पालन करताना
मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा
मुलगा खूप खुश होता. आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच
संपली होती. जी परत आयुष्यात येत होती. महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी
निर्णय घेतला. माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत
नसल्याच
स्पष्टपणे सांगितले. ती चिडली, संतापली, पण आता मला काही ऐकायाच

नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता. मी वेगाने
CAR चालवत घरी आलो. माझ्या चेहऱ्यावर हसू होत. हातात फुलांचा गुच्छ होता. मी
बेडरूम मध्ये पोहचलो, तर माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती. मुलाला जवळ
घेऊन मी अनावर रडत सुटलो. माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे
करायला हव ते केल नाही. जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही.
आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते. पती-पत्नीच्या नात्यात कार , बंगला ,
प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही. महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि
विश्वास.

वाचा आणि विचार करा. स्वताला विचार--- " आपल वैवाहिक आयुष्य
खरच सुखाचं आहे?"

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आहे--
जे प्रेमाच आहे, जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.

नाही तर
पश्चाताप.....
तू जाण्याचे इशारे जेव्हा जाणवती,
नकळत तेव्हा माझे डोळेही पाणावती.

सहन होत नाही विचार, तुझ्याहून दूर राहण्याचा,
छंदच जडलाय जणू मला तुला रोज पाहण्याचा.

तू काढलेल्या चिमट्याची वेदनाच जाणवत नाही,
तू नसशील सोबत ही कळच खरी सोसवत नाही.

शनिवारी जातो जड पावलांनी घरी,
वाटतं कि असूच नये सुट्टी रविवारी.

सुट्टीची सकाळ मित्रांमध्ये, दुपार घरात जाते निघून.
सांज मात्र एकांतात गुपचूप जाते निजून.

अर्ध्या रात्री आठवतात न हसण्यासारखे Jokes ही ,
स्वतःवर झालेले comments जरी हसले सारे लोकही.

हसणं रुसणं बसणं बोलणं सारं काही एकाचसाठी,
Proposes किती नाकारून मन हि झुरतय तुझ्याचसाठी.

हसता हसता रडतो, रडता रडता हसतो मधेच,
प्रेम आहे हे प्रेम, वेड वैगरे नाही उगीच.

सर्व Login ID साठी तुझंच नावं Password आहे,
माझ्या वहीत मीच फिकटसा तुझंच रंग गडद आहे.

तू जाशील सोडून जग माझे, मला हा विचारच पटत नाही.
तुझ्याहून दूर राहण्याची माझ्यात हिम्मतच साठत नाही.
"आयुष्य....."
============================


चांगले वाईट प्रसंग आणि
......कडू गोड आठवण...
आयुष्य म्हणजे अनुभवांची
एक मोठी अनमोल साठवण..

"माझे आयुष्य कष्टाचे"..
असे प्रत्तेकाला वाटे..
दिसत नाहीत जोपर्यंत..
दुसर्याला बोचलेले काटे...

आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर,
असतो एक धोका...
सावध रहा - संधी पहा..
मगच मारा चौका...

आयुष्यावर प्रेम करणे...
हे लक्षात ठेवा महत्वाचे तत्व,
कारण, शेवटी मृत्यू आहे ,
म्हणूनच आयुष्याला आहे महत्व.

आयुष्यावर प्रेम करावे..
असे सांगतात विचारवंत..
काहीतरी जगायचं राहून गेलं....अशी
कदाचित राहिली असावी खंत..

आयुष्य राहिले तर .. पैसा मिळवण्याची
देऊ शकाल हमी...
पण पैशामागे धावून धावून..
नका करू .. आयुष्य कमी..

आयुष्यात कधीही कायम नसते,
सुख-दुःखाची वेळ..
म्हणूनच संकटांना भिवून .. संपवू नका,
आपल्याच आयुष्याचा खेळ..

कठीण आहे सांभाळणे,
प्रत्तेक माणसाचे मन...
म्हणूनच...आयुष्यात जोडलेली माणसं..
हेच खरे धन..

जीवनावर चिंतन करायला....
माणसाला आज वेळच नाही..
म्हणूनच संदीप-सलील सुचवतात...
माहितीये मला की तू आधीच कुनाचा तरी झालयास
म्हणून मी म्हणणार नाही कि तू माझा हो ...
फक्त म्हणणे आता एवढच की जसा होतास तसाच राहा
भासवु नकोस की "तू माझ्या आयुष्यातून गेलायेस"
माझा हट्ट नाही कि तुझे माझ्यावर प्रेम असूच दे
हट्ट आता इतकाच कि मनातील तुझे प्रतिबिंब तसेच राहू दे
माहितीये मला कि डोळे तुझे वाट माझी कधीच पाहणार नाही
पण डोळे माझे वाट तुझी कधीच आयुष्यात चुकवनार नाही ..
माहितीये मला कि माझ्यामुळे हास्य तुझ्या चेहऱ्यावर कधीच खुलणार नाही ...
पण विसरू नकोस कि मी ही आता आयुष्यभर हसणार नाही ...
माहितीये मला कि तुझ्या हृदयावर आता दुसऱ्याच कोणाचा अधिकार आहे
पण माझ्या त्या गोड आठवणीतल्या तुझ्यावर फक्त माझाच अधिकार आहे
अस हृद्य तयार करा की .....
त्याला कधी तडा जाणार नाही .....
अस हृद्य तयार करा की .....
हृदयाला त्रास होणार नाही .....

असा पर्श करा की .....
त्याने जखम होणार नाही ......

अशी मैत्री करा की .....
त्याचा शेवट कधी होणार नाही .........
आयुष्य असच जगायचं असतं........
कुठून सुरु झालं हे माहित नसलं, तरी कुठे थांबायचं हे माहित असतं, आयुष्य असच जगायचं असतं.
जे घडेल ते सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं, आयुष्य असच जगायचं असतं.
कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं, आयुष्य असच जगायचं असतं.
दुःख आणि अश्रुंना मनात कोंडून ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं, आयुष्य असच जगायचं असतं.
पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं, आयुष्य असच जगायचं असतं.
मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी, मागून मागून काय मागितलस् असच म्हणायचं असतं, आयुष्य असच जगायचं असतं..........................​........
इतकी सुंदर का दिसते ती?
मनात माझ्या का ठसते ती?...

विचारता मी, टाळे उत्तर--
आणि खळाळुन का हसते ती?...

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...

मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसते ती?...

भेटत नाही कधी तिला मी
तरी खुशाली का पुसते ती?...

कसे वागणे 'अजब' तिचे हे?
'नसताना'ही का असते ती?...

इतकी सुंदर का दिसते ती?..................
प्रत्येकालाच वाटते की,
सुखात सहभागी होणारी,
दु:खात पाठीशी असणारी,
संकटात हाताशी धरणारी,
अशी 1 "मैत्रीण" असावी.
होय ना?

लाज वाटते का हो म्हणायला?
.
.
.
.
.
"आधी ओढा अभ्यासाचा गाडा,
मग पहा वरातीचा घोडा.
इस दुनिया में 3 तरह के लोग होते हैं.
1. जो मतलब के लिए बात करते हैं....
2.जो बातो में मतलब निकालते हैं,.....
3.जो बातो का सही मतलब समझते हैं...
its depnd upon u
अशीच रोज ती मला लपून पाहते...
पहावया नको कुणी जपून पाहते...
मनातले अनेकदा लिहून फाडले
तरी पुन्हा मनातले लिहून पाहते...

...हृदयात तिच्या कोण राहते..
सारखे ती त्याला विचारते..
वाटते तिला बोलावे मजशी,
पण न जाणे का बावरते..

मनात तिच्या मूर्ती कुणाची..
सांगड घालत सारखी राहते..
डोळे मिटताच ती स्वप्नात...
निशब्द पणे त्यालाच पाहते..

कळेल का मला कधी..
गूढ तिच्या मनातले..
स्वतःच्या स्वप्नात ती...
अशी कुणाला शोधते..
आलाच आहे आयुष्यात, तर शेवटपर्यंत साथ दे !
हातात माजा प्रीतिचा नेहमीच, तुजा हात दे !
क्षण विरहाचे विसरून आता, मिलनाचे वेध दे !
तुज्या ह्रदयात माज्या प्रीतिची, कली अशीच उमलू दे !
माज्या श्वासात तुज्या सुगंद्याची, जाणीव माला होऊ दे !
नजरेत तुज्या फ़क्त मला, माजी प्रतिमा पाहू दे !
मनात तुज्या नेहामिसाठी, फ़क्त मलाच राहू दे !

आलाच आहे आयुष्यात, तर शेवटपर्यंत साथ दे !

मी दुसर काहीच मागणार नाही, फ़क्त प्रीतिचा हात दे !
** मी त्याला 'एप्रिल फूल' बनवले **



'नक्की कोण तू माझा' प्रश्नाचा मी निकाल लावायचे ठरवले,

निकालाचा दिवस 'एक एप्रिल' ला निवडले,

प्रेमपत्र त्याच्या हातात दिले,

नजर त्याची झाली कावरीबावरी,
वाटलं हिची लग्नपत्रिकाच..हातात पडली..

त्याच्या चेह-यावरचे भाव वाचत होते,

माझ्या उतराच्या मी जवळ जात होत्ते,

आनंदाने तो बोलला,माझ्या मनातले बोललीस,

तुला विचारायची इच्छा होती पण नकाराने,
दोस्ती तुटु नये हीच काळजी होती..

विचार केला, विमान याचे खाली आणूया,

म्हटले त्याला, अरे वेडया, 'एप्रिल फूल' केले तुला,

दोस्तीत आपल्या प्रेम बिम आणाच कशाला,

उसने हसु आणत कसाबसा बिचारा बोलला,
'जातो,उशीर झालाय'..म्हणत त्याने रस्ता धरला..

डोळे भरले होते त्याचे,मी ही काही क्रूर नव्हते,

धावत त्याला थांबवले,परत 'एप्रिल फूल' बोलले,

माझ्या डोळ्यांतले भाव त्याने ऒळखले,

'एक एप्रिल'ने मैत्रीत प्रेमाचे धागे गुंफले,
'नक्की कोण आम्ही एकमेकांचे' ह्या प्रश्नाचे उत्तर दिले.
अबोल प्रीत.

पाहीले मी तूझाया पासून दुर जाउन
पण मला ते जमलेच नाही
मन इतके रडले कि, पुन्ह हा विचार
...मनात आलाच नाही
पण, तु................
तूच माझया पासून दुर गेलास
न राहुनही मला गप्प रहावे लागले
नाजूक मनाला इतके काटे बोचले, कि
मी रडले नसून माझे मनच रडले
निरोपही तूला देउ शकले नाही
मजबुर इतके मी होते
मनातली भावना तशीच राहुन गेली,
हातातली वेळ अशीच निघुन गेली की,
माझी अबोल प्रीत अबोलच राहुन गेली.........
अस हृद्य तयार करा की .....
त्याला कधी तडा जाणार नाही .....
अस हृद्य तयार करा की .....
हृदयाला त्रास होणार नाही .....

असा पर्श करा की .....
त्याने जखम होणार नाही ......

अशी मैत्री करा की .....
त्याचा शेवट कधी होणार नाही .........
एक नाते मैत्रिचे
चुकलेल्या योग्य मार्ग दाखवणारे,
तर कधी चूकीच्या रस्त्यावर चालत जायला सांगणारे!

एक नाते मैत्रिचे
सुर्यासारखे तेजस्वी प्रकाश देणारे
तर कधी अंधारातच सोडून जाणारे!

म्हणूनच, तर मैत्री करावी
सुख-दुःखात साथ देणाऱ्या मित्रांशी
ना चूकीच्या रस्त्यावर चालावला सांगणाऱ्यांशी

म्हणून.. मैत्रीचे नाते असावे

फुल-काट्यांच्या जोडीसारखे,
नेहमीच कष्टाने सुखी रहंणारे!
नक्की वाचा..
आई -बाबांचा संदेश..आपल्या मुलांसाठी..
१) जेव्हा तू आम्हाला म्हातारे झालेले पाहशील तेव्हा.. आम्हाला समजण्याचा प्रयत्न कर..
२) जर कधी कोणती गोष्ट विसरलो तर.. तू आमच्यावर रागावू नकोस.. तू आपले बालपण आठव..
३) आम्ही म्हातारे झाल्यावर चालू नाही शकलो तर.. तू आमची काठी हो..आणि तुझे पहिले पूल आठव..
४) जर आम्ही कधी आजारी पडलो तर. ते दिवस डोळ्यासमोर ठेऊन पैसे खर्च कर जेव्हा आम्ही तुझ्या आनंदासाठी.. आमचे सुख पणाला लावले..

आपल्या आई-बाबांचा आदर करा..
‎8 best moments in life
1.
Giving the 1st salary to ur parents.
2.
Thinking your love with tears.
3.
Looking old photos & smiling.
4.
A sweet & emotional chat with friends
5.
Holding hands with your loved ones for a walk.
6.
Getting a hug from one who cares for you.
7.
1st kiss to your child when he /she is born.
8.
The moments when your eyes are filled with tears after a big laugh.
Wish u all such gr8 moments!
Have a wonderful life!...
♥ LIKE IF U LIKE THIS LIFE ♥
तू सोडून गेल्यावर...माझा श्वास थाम्बेल
एक थेम्ब अश्रु काढ आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक...

माझ्यानंतर माझी आठवण काढू नकोस..
माझा विचार मनातून काढून टाक..

माझ्या पत्रांना ..जवळ ठेऊ नकोस...त्रास होइल..
त्या आठवणीना जालून टाक...

मी गेल्यानंतर...माझी स्वप्न ही मरून जातील..
माझ्या स्वप्नाना...माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक..

मी मेल्यावर...कुणी विचारलं..कोण होता तो...?
तर "एक वेडा" होता अस सांगुन टाक.
.
जिवलग मैत्रिण म्हणुन.. कुणी तुला विचारल.. आजार काय होता??
तर नजर झुकवुन "प्रेम" सांगुन टाक...
कुणाला इतकाही वेळ देऊ नये, की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा..
एक दिवस आरशासमोर आपणास आपलाच चेहरा परका व्हावा.. *
आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न ...........

वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं

म्हणाली, चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतो

चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?

टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला

नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला

आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण

दुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण

मग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं

विचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं

एक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?

Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?

शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी

प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी

लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटली

हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली

प्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते

कारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,

ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असते.

प्रेम रोग

प्रेम रोग
.
आताच विश्वसनीय सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार एका खूप मोठ्या रोगाचा शोध लागला असून तो खूप घातक रोग असे डॉक्टरांचे मत आहे. त्याचे नाव ‘प्रेम रोग’ असे ठेवण्यात आले आहे. यावर अधिक संशोधन करून त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु सध्याला तरी यावर कोणताही कोणताही इलाज नाही. त्यामुळे सध्याला ‘सावधानता हाच उपाय’ आहे. या रोगाची दाहकता चाचापण्यासाठी बॉलीवूडचा एक स्टार सलमान ‘उघडे’ किंवा सुप्रसिद्ध नोज सिंगर हिमेशभा’ऊs’ रेशमिया यांची माहिती मिळवावी. जगभरात अनेक रोगी आढळल्याने यावर इलाज शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.
.

प्रेम रोगाचा इतिहास-
ह्या रोगाचा उगम कधी झाला हे सांगणे खूप अवघड आहे. यावर संशोधक संशोधन करीत आहेत. कदाचित मानवाच्या वंशाजांपासून याची सुरवात झाली असावी, अस त्यांचे मत आहे..
.

प्रेम रोगाची ठिकाणे-
हा रोग कोणालाही होवू शकतो. आजकाल टीव्ही सिरीयल आणि चित्रपटांच्या प्रसाराने लहान मुले देखील याला बळी पडू शकतात. सामान्य दिसणाऱ्या अथवा सुधृढ शरीर यष्टी असलेल्या कोणत्याही स्त्री/पुरुष/वृद्ध* [निशब्द- मधील बिग बी ला देखील या रोगाने पछाडलेले]/लहान मुले यांना हा रोग होवू शकतो. या रोगाचा प्रसार कुठेही होवू शकतो. परंतु शाळा, कॉलेज, रस्ता, चाळ, कंपनी, कॅन्टीन, सोसायटीच्या आवारात असा कुठेही हा रोग होवू शकतो.
.

प्रेम रोगाची लक्षणे-
हे सर्व ‘कळत नकळत’च घडत असल्याने ह्या रोगाची अशी विशिष्ट लक्षणे नाहीत. परंतु, सामान्यतः खालील गोष्टी ह्या रोगाच्या बळी पडलेल्या व्यक्तीला होतात.
विशिष्ट एका व्यक्तीच्या असण्याने/दिसण्याने/संपर्कात आल्याने अचानक प्रफुल्लीत होणे.
ती विशिष्ट व्यक्ती सोडून दुसरे कोणीच व्यक्ती आपलेसे न वाटणे.
सतत त्याच एका व्यक्तीबद्दल प्रेमभाव निर्माण होणे.
व्यक्ती समोर आल्यावर धडधड वाढणे, घाम फुटणे, जीव कावरा बावरा होणे.
त्या व्यक्तीसमोर काहीच बोलता न येणे.
परंतु त्याच व्यक्तीसमोर सतत जाण्याची अथवा व्यक्तीच्या संपर्कात राहण्याची इच्छा होणे.
सतत त्याच व्यक्तीचे विचार येत राहणे. त्यामुळे व्यवस्थित झोपही न येणे. अथवा झोपेत त्याच व्यक्तीबद्दल स्वप्न पडणे.
मित्र/मैत्रिणी सोबत असतांना देखील एकटेपणा वाटणे.
त्या व्यक्तीबद्दलच गप्पा माराव्या वाटणे.
सर्व ठिकाणी त्या विशिष्ट व्यक्तीचा आभास होणे.
ही सामान्य लक्षणे समजावीत. याहून कितीतरी अधिक लक्षणे व त्यांच्या माहितीसाठी ‘कळत नकळत’च्या मधुरा पाठक (देशमुखांच्या ‘ऋजुता’ला) भेटावे.
.

प्रेम रोगाचे (दुष्प)परिणाम-
जीवनावर याचे गंभीर परिणाम होतात. प्रेम रोग ग्रस्त व्यक्ती न व्यवस्थित राहते. न ज्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेले प्रेम, त्या व्यक्तीला राहू देते. सतत रोग ग्रस्त व्यक्ती प्रेमभाव वाटणार्या व्यक्तीच्या अवतीभवती फिरते. झोप व्यवस्थित न झाल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे मनस्ताप व चिडचिड होण्याचा संभव. कदाचित जर ती विशिष्ट व्यक्ती चांगल्या प्रकारे वागणूक देत असेल तर, ह्याच्या उलटही घडू शकते. परंतु सामान्यतः लाखास एक असे प्रमाण असल्याने याचे सुपरिणाम पेक्षा संभाव्य धोक्याचीच चिंता केलेली योग्य.
.

प्रेम रोगावर उपाय-
ह्यावर अजून कोणताही इलाज शोधला न गेल्याने हा रोग ‘नाईलाज’ आहे. परंतु, रोगमुक्त झालेल्या व्यक्तींच्या अनुभवावरून काही उपाय
आत्महत्या- हा सर्वोत्तम उपाय आहे. सर्व नाईलाज रोगांचा उत्तम व सोपा उपाय.
त्या व्यक्तीसोबत ‘लग्न’ करावे. व्यक्तीचे खरे स्वरूप आपोआप कळून जाईल.
ते न शक्य झाल्यास दुसर्या कोणत्या तरी व्यक्तीच्या प्रेमात पडावे.
विवेकानंदांची अथवा साधू पुरुषांचे/अध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करावे.
एक आकर्षण आहे, असा स्वतःचा समज करून घ्यावा. त्याकरिता जेम्स बॉन्डचे जुने चित्रपट पाहावेत. अथवा स्वतः जेम्स बॉन्ड आहोत असा समज करून घ्यावा.
हे सर्व शक्य न झाल्यास त्या व्यक्तीला मनातील सर्व सांगून टाकावे. कदाचित ती व्यक्ती चिडली तर रोग कमी होण्याची अधिक शक्यता.
वरील सर्व उपाय न जमल्यास दारू, सिगारेट अथवा अन्य एखादे व्यसन लावून घ्यावे.
तेही न शक्य झाल्यास ‘रडत’ बसावे.
हा सर्वात अवघड परंतु रोग निदान उपाय – त्या व्यक्तीला आपल्या प्रेमात पाडावे. यासाठी एखादा ‘प्रेमगुरु’ अथवा रेडीओ वरील कार्यक्रमांचा आधार घ्यावा. अथवा ज्यांनी हा उपाय शक्य करून दाखवला त्यांची मदत मागावी.
यातील कोणताच उपाय करू न शकल्यास स्वतःला बेकार समजून नुसते आकाशाकडे किंवा एकटक पाहत बसू नये. कारण ह्या गोष्टीमुळे कामाचा व्याप वाढला असेल. तो डोंगर कमी करावा. ‘गझनी’ मधील अमीर, ‘देवदास’ मधील शारुख अथवा ‘तेरे नाम’ मधील सलमान समजून वागू नये..

इतरांसाठी एक विशेष सूचना-
जर तुम्हाला या लक्षणाचा कोणी रोगी आढळल्याला त्यावर भूतदया दाखवावी. वेडा अथवा मूर्ख समजून त्याची हेटाळणी करू नये.. परंतु धोका नको म्हणून वेड्याचा इस्पितळाचा नंबर घेऊन ठेवावा...