Monday, July 30, 2012

तो: ऐक ना..तू इतकी चांगली नको वागूस सगळ्यांशी.

ती:अरे पण मी काय केलेय आता? मी तर एकदम साधी वागतेय...

तो: तेच तर ना..... "सामान्य रहाणं हिच एक असामान्य गोष्ट आहे...आणि तितकीच कठीण नि वाईट आहे.." तू जितकी चांगली वागशील ना तितका तू स्वत:वर अन्याय करून घेतेयंस...अपेक्षा वाढतात गं सगळ्यांच्या आपल्याकडून..... आणि त्या आपण पूर्ण नाही करू शकलो ना तर दोष आपल्याकडे येतो...

चूक जगाची नसते..... " लोकांनी आपल्याकडून काय अपेक्षा करावी हे आपणच आपल्या कृतीतून ठरवत असतो..."

ती: हम्म्म.....तू पण ना.....खरंच वेडू आहेस....
काय करू मग मी आता...? वाईट तरी कशी वागू...?

तो: ते पण खरेच आहे म्हणा.... " वाईट वागायला पण वाईट असावं लागतं..."
तुझं मनच मुळात निर्मळ...मग तू बिचारी तू तरी काय करणार...?

पण.......... सोड,जाऊ दे.आहे तशीच वाग....
" गोड पाण्याच्या नदीमुळे समुद्र कशी ना कधी गोड होइलच....."

ती: (गालातल्या गालात हसली.)

तो: ये चांगलं वाग सांगितलं ना....?????
तू पण खूप दुष्ट आहेस हा.....काही चांगली वगैरे नाहीयेयस...

ती:(चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह) ???????

तो: " अशी हसत नको जाउस.....
तुझं हसणं वेड लावतं मला...."
पुन्हा ती तशीच वाईट वागली... :P

No comments:

Post a Comment